साधूंची हत्या झाली तेंव्हा काँग्रेसची संवेदना कुठे लुप्त पावली होती – राम कदम VIDEO

साधूंची हत्या झाली तेंव्हा काँग्रेसची संवेदना कुठे लुप्त पावली होती – राम कदम VIDEO

मुंबई – भाजपचे आमदार राम कदम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हाथरस प्रकरणानंतर पीडित परिवाराला भेटण्यासाठी 35 खासदार आणि हजारो लोकांचा काफिला कोरोना काळात घेऊन जाणारे राहुल आणि प्रियांका गांधी राजस्थानमधील करोलीमध्ये झालेल्या साधूच्या हत्याकांडानंतर त्यांच्या पीडित परिवाराला भेटायला कधी जाणार ? असा सवाल राम कदम यांनी केला आहे. त्यांची संवेदना जात धर्म आणि प्रदेशतील राजकारण यांच्याशी जोडलेली आहे की काय ?, पालघर असो की करोली साधू हत्याकांड काँग्रेस नेत्यांचा समस्त संत आणि साधू समाजाच्या बाबतीत असा पक्षपात का ? याचे उत्तर काँग्रेसला द्यावे लागेल ? असंही भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.

COMMENTS