राज्यपालांच्या सल्ल्यानंतर राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, वाढीव वीज बिलाबरोबरच या मुद्यांवर केली चर्चा !

राज्यपालांच्या सल्ल्यानंतर राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, वाढीव वीज बिलाबरोबरच या मुद्यांवर केली चर्चा !

मुंबई – वाढीव वीज बिलाबाबत काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीवेळी याप्रकरणी तुम्ही शरद पवारांशी बोलून घ्या असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला होता. राज्यपालांच्या या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी शरद पवारांना फोन करून वाढीव वीज बिलांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता अशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच दिली आहे.

याबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत की, राज ठाकरे यांचा मला फोन आला होता. मात्र भेटण्याबाबत ठरलेले नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. राज्यपालांनी फोन करायला सांगितल्याने मी फोन केल्याचं राज ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज बिलं आली आहेत. यातून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. राज ठाकरे यांनीही काल राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि हिच मागणी केली होती.

दरम्यान दूध उत्पादक शेतकय्रांबाबतही राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे’, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली असल्याची माहिती आहे.

COMMENTS