पंतप्रधान मोदीजी आपण गप्प का?,  राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल!

पंतप्रधान मोदीजी आपण गप्प का?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल!

नवी दिल्ली – गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये चीनचे ४३ सैनिक ठार झाले तर भारताचेही २० जवान शहीद झाले आहेत. यात भारताच्या कर्नल हुद्दय़ाच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. चीनी सैन्यासोबत झालेल्या या धुमश्चक्रीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारले आहेत.

पंतप्रधान मोदीजी आपण गप्प का आहेत?,जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली?, पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? ते लपून का बसत आहेत? झाले तेवढे बस्स झाले! काय झाले ते आम्हाला समजलेच पाहिजे. आपल्या जवानांना मारण्याची चीनची हिंमतच कशी झाली? आपली जमीन बळकावण्याची चीनचे धारिष्ट्य कसे झाले, असं अने प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले आहेत.

COMMENTS