पंतप्रधान मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यानं निर्णय बदलला, राजकारणातून घेणार होते संन्यास !

पंतप्रधान मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यानं निर्णय बदलला, राजकारणातून घेणार होते संन्यास !

कोलकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे एका केंद्रीय मंत्र्यानं राजीनाम्याचा निर्णय़ मागे घेतला आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये उफाळलेल्या जातीय हिंसाचारानंतर खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी पदाचा राजीनामा आणि राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला असून आसनसोल हिंसाचारानंतर मी पंतप्रधान मोदींना भेटलो आणि पदाचा राजीनामा आणि राजकारणातून संन्यास घेत असल्याचं सांगितलं. परंतु संन्यास घेण्याऐवजी लढा सुरुच ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बाबुल यांनी केला आहे.

दरम्यान ‘ममता बॅनर्जी यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं आहे. राज्यात विरोधक शिल्लक राहायला नको, असं तृणमूल काँग्रेसला वाटतं. मुंबई आणि दिल्लीत असताना चांगलं आयुष्य जगत होतो. पण राजकारणात आल्यानंतर मला तिरस्काराचा सामना करावा लागत असल्यामुळं मला प्रचंड नैराश्य आलं असल्याचंही बाबुल यांनी म्हटलं आहे.

COMMENTS