भाजपला दुसरा धक्का, आणखी एक मित्रपक्ष एनडीएतून बाहेर !

भाजपला दुसरा धक्का, आणखी एक मित्रपक्ष एनडीएतून बाहेर !

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर आता भाजपला दुसरा एक मोठा धक्का बसला असून केरळमधील भाजपचा एकमेव मित्रपक्ष असलेल्या भारतीय धर्म जन सेना (बीडीजेएस)ने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी अशुभ असल्याचं बोललं जात आहे. तसेच टीडीपीने याआधी भाजपची साथ सोडली असून आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनही एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजपच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.

बीडीजेएस पक्षाचे प्रमुख वेल्लापल्ली नटेसन हे गेली अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. परंतु त्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी एनडीएची साथ सोडली असल्याची माहिती आहे. 2015 मध्ये भारतीय धर्म जन सेनेची स्थापना झाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत एनडीएमध्ये सहभागी झाले होते. तसेच केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याआधीच बीडीजेएसनं भाजपची साथ सोडली असल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. केरळमध्ये डाव्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने बीडीजेएसचा हात पकडला होता पण त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला असल्यामुळे केरळमधील आगामी निवडणूक भाजपसाठी मोठी जिकीरीची ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बीडीजेएस एनडीएमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे पंप्रधान नरेंद्र मोदी यांची आजच्या एकाच दिवशी मोठी डोकेदुखी झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS