मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती, आठ जिल्ह्यांची ‘या’ मंत्र्यांवर जबाबदारी !

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती, आठ जिल्ह्यांची ‘या’ मंत्र्यांवर जबाबदारी !

मुंबई – मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध आठ जिल्ह्यांसाठी नव्या मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आणखी एका म्हणजेच चंद्रपूरसोबतच गडचिरोलीचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या मंत्र्याकडे हा जिल्हा?

हिंगोली – अतुल सावे

वर्धा – चंद्रशेखर बावनकुळे

बुलडाणा – संजय कुटे

गडचिरोली – सुधीर मुनगंटीवार

अमरावती – डॉ. अनिल बोंडे

पालघर – रवींद्र चव्हाण

भंडारा – डॉ. परिणय फुके

गोंदिया – डॉ. परिणय फुके

दरम्यान औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता होती. औरंगाबाद शहराचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्याची मागणी केली जात आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी कायम आहेत. त्यामुळे याठिकाणी स्थानिक भाजपमध्ये नाराजी आहे.

COMMENTS