कोणी कितीही टराटर केलं तरी आभाळ फाटणार नाही, शिवसेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीची उडी, पाहा काय म्हणाले मंत्री नवाब मलिक?

कोणी कितीही टराटर केलं तरी आभाळ फाटणार नाही, शिवसेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीची उडी, पाहा काय म्हणाले मंत्री नवाब मलिक?

मुंबई – शिवसेना आणि भाजपच्या वादात आता राष्ट्रवादीनं उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी कितीही टराटर केली तरी आभाळ फाटणार नाही. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही’, असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वेगवेगळे भाष्य करुन भाजप जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करतेय शिवाय राज्यपाल व त्यांचे नेते लोकांची दिशाभूल कशी करतात हे उघडपणे दिसत आहे. धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही. भाजप धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करते हे लोकांना माहीत असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS