कोकणात ‘या’ ठिकाणी होणार नाणार प्रकल्प, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

कोकणात ‘या’ ठिकाणी होणार नाणार प्रकल्प, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

मुंबई – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प
रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास स्थानिकांचा विरोध नसून ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नसल्याचही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प आता रत्नागिरी ऐवजी रायगडमध्ये होणार आहे.

दरम्यान रत्नागिरीतील नाणारमध्ये होणाय्रा या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता.तसेच भाजपबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली होती. स्थानिकांनीही मोठा विरोध दर्षवला होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यानंतर हा प्रकल्प आता रायगडमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

COMMENTS