ती तुमची जहागीरी नाही, खासदार अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका!

ती तुमची जहागीरी नाही, खासदार अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका!

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री ठरवण्याची तुमची जहागीरी नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे. तसेच रयतेचे राज्य पुन्हा आणण्यासाठी ही राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. तर पाच वर्षे काम करण्यात यश न आल्याने जनादेश द्या, हे सांगण्यासाठी महाजनादेश ही यात्रा मुख्यमंत्र्यांनी काढली असल्याचा आरोपही कोल्हे यांनी केला आहे.

दरम्यान पारदर्शक कारभाराचे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेवर आलात मात्र पाच वर्षांत काहीच करु शकला नाहीत म्हणूनच तुम्हाला ही महाजनादेश यात्रा काढावी लागली. भविष्य साकारण्याची संधी येत्या विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे. त्याचा विचार करा. भाजपची महाजनादेश, तर शिवसेनेची जनआशिर्वाद यात्रा जनतेवर लादलेली आहे. मात्र. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मनाने काढण्यात आलेली आहे. तसेच ठोस आश्वासन घेवून ही शिवस्वराज्य यात्रा निघाली असून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी, जातीजातीमध्ये तेढ कमी करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचंही कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगर येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलत होते.

COMMENTS