घटनात्मक खंडपीठ स्थापनेसाठी सरकार प्रयत्नशील- अशोक चव्हाण

घटनात्मक खंडपीठ स्थापनेसाठी सरकार प्रयत्नशील- अशोक चव्हाण

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत जोपर्यंत घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील, सरकार मदत करत आहेत,’ असे प्रतिपादन मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील व सदस्य उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बातचीतदरम्यान अशोक चव्हाण यांनी म्हटले की, ‘मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फडणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचे नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे,’ ‘आज झालेल्या बैठकीत गेल्या 10-12 दिवसातील हायकोर्टाच्या निर्णयांवर चर्चा झाली. EWS किंवा SCBC या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निर्णय, EWS बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली.’

‘आज खासदार संभाजीराजेही भेटणार आहेत. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. सुप्रीम कोर्टात चार वेळा लेखी दिलं आहे. कोरोनामुळे कोर्टाची सुनावणीही व्हिडीओद्वारे होतं आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील, सरकार मदत करत आहेत,’ असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

COMMENTS