भारताच्या अहंकारी प्रतिसादामुळे निराश – इम्रान खान

भारताच्या अहंकारी प्रतिसादामुळे निराश – इम्रान खान

इस्लामाबाद –  भारताच्या नकारात्मक आणि अहंकारी प्रतिसादामुळे निराश झालो असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. “मी आपल्या आयुष्यात अशा छोट्या लोकांना भेटलो, जे लोक कार्यालयांमध्ये मोठ्या पदांवर बसले. मात्र, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका इम्रान खान यांनी केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. परंतु भारताच्या प्रतिसादामुळे आपण निराश झालो असल्याचं ट्वीट इम्रान खान यांनी केलं आहे.

दरम्यान भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांतीसाठी नुकताच चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, पाकिस्तानाकडून कुरापती सुरुच असल्याने भारताकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी भारताबाबत संताप व्यक्त केला. “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. मात्र, भारताच्या नकारात्मक आणि अहंकारी प्रतिसादामुळे निराश झालो असून भारत गर्विष्ठ, नकारात्मकतेने भरलेला देश असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.

 

COMMENTS