मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा !

मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा !

मुंबई –  मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील आणि मकरंद कर्णीक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. तसंच याचिकेवर येत्या 10 डिसेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन घटनाबाह्य निर्णय घेतला असल्याची याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी झाली.

दरम्यान या याचिकेमध्ये मराठा समाजाला घटनेनुसार 50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. त्यामुळे आरक्षण रद्द करावे अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावेळी, तातडीने आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

तसेच यापूर्वी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. याचिका दाखल करण्यासाठी ऑन रेकॉर्ड वकील उपस्थित असणे आवश्यक असते, या तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर न्यायमूर्तींनी  याविषयी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

 

COMMENTS