देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र!

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र!

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.मुंबईतील केईएम रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे १० रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं असून राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णालयात होत असणारे मृत्यू, रुग्ण आणि मृतांची झपाट्याने वाढणारी संख्या या सगळ्याचे निदर्शक असल्याची टीका
केली फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस यांचं पत्र

मुंबई आणि राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस हालाखीची होत आहे. १९ जूनला राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ३८२७ कोरोना रुग्ण आढळून आले. तर मृतांचा आकडा ११४ इतका होता. जून महिन्यातील आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास या महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५२.१८ टक्के वाटा हा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई आणि एमएमआर क्षेत्राचा विचार केला असता हा वाटा ७३.८५ टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यातील १८ दिवसांचा विचार केला असता राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येत ३७.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मुंबईत ही वाढ ३५.१६ टक्के इतकी असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

COMMENTS