पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले…

पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई – महाविकासआघाडी सरकारचं काल खातेवाटप झालं. त्यानंतर आज मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी सर्व विभागाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. सहा मंत्र्यांकडेच सगळ्या खात्यांचा कार्यभार दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अंतिम खाती जी राहतील त्याप्रमाणे प्रत्येक मंत्री काम करेल. तसेच आमचं सरकार सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. या राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, सर्वांना न्याय देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न असेल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात काय भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील. राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली या सरकारचा कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री महोदय तीनही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करुन, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

COMMENTS