“काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 175 जागा निवडून येणार!”

“काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 175 जागा निवडून येणार!”

पुणे – भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महागाई मोठ्याप्रमाणात वाढली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झालं आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. राज्याच्या डोक्यावर पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे.राज्यातील तरुण शेतकरी सध्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 175 जागा निवडून येतील, अशा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यातील प्रचारसभेत बोलत होते.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असलेल्या जागेपासून जवळच एका तरुण शेतकऱ्याने भाजपाचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली. इतका दुःखद प्रकार घडला असतानाही मुख्यमंत्री त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे यांना शेतकय्रांशी काही देण-घेण नसल्याचं दिसत आहे.

तसेच मुख्यमंत्री सातत्याने आम्हाला विरोधक दिसतच नाहीत असं म्हणतात मग जर विरोधक मैदानात नाहीत तर राज्यात इतक्या सभा कशाला घेता? केंद्रातून इतके मंत्री कशासाठी येत आहेत? नरेंद्र मोदी, अमित शहा कोणासाठी सभा घेत आहेत? निवडणुकीच्या आधी तुम्हाला यात्रा काढण्याची गरज का भासली? असे सवालही यावेळी अजित पवार यांनी विचारले आहेत.

COMMENTS