उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याबाबत घेतला ‘हा’ निर्णय !

उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याबाबत घेतला ‘हा’ निर्णय !

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री आणि
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांच्याशी फोनवर बोलताना परभणीतील स्थानिक पातळीवर पक्षाशी संबंधित काय समस्या आहेत, यावर चर्चा केली. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रश्न सोडवला जाईल. तो तितका फारसा मोठा प्रश्न नाही, अशी समजूत घालून खासदारकीचा राजीनामा मागे घेण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना दिली आहे. त्याअनुषंगाने संजय जाधव राजीनामा मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. यामध्ये त्यांनी फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा करूनही काहीही झालं नाही.या समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले.

मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले आहेत. त्यामुळे राजीनामा त्यांनी राजीनामा दिला होता.परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांची फोन करुन मनधरणी केली आहे.

COMMENTS