आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो – मुख्यमंत्री

आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो – मुख्यमंत्री

मुंबई – माजी मंत्री श्री पतंगरावजी कदम यांच्या अचानक आपल्यातून निघून जाण्याने आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. एक मोठे शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आपल्यातून निघून गेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांच्या गावांतून एसएससीची परीक्षा उत्तीर्ण करणारे ते पहिले विद्यार्थी होते. पण, शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज 5 ते 6 कि.मीचा प्रवास करावा लागत असे. आपल्या बालपणीच्या या व्यथांची आठवण ठेवत त्यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि प्रत्येक वंचिताला, गरजूला शिक्षण मिळावे, याची सोय केली. सहकार क्षेत्राची बांधणी करण्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते आणि ते सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र, आप्तस्वकिय यांच्या दु:खात मी सहभागी असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS