भुजबळ कुटुंबीयांचं कार्यकर्त्यांना आवाहन !

भुजबळ कुटुंबीयांचं कार्यकर्त्यांना आवाहन !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं असून मुंबईत येण्याची घाई करु नये असं त्यांनी म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वात अगोदर भुजबळ हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. परंतु असा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भायखळा भाजी मंडई येथे उपस्थित रहावे, छगन भुजबळ सर्वांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिल्याचा हा मेसेज होता. परंतु असं काहीही नसल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करु नये, किंवा मुंबईत येण्याची घाई करु नये, असं आवाहन भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. भुजबळ साहेब भेटण्यासाठी नंतर वेळ देतील, मात्र आत्ताच घाई करु नये, असं भुजबळ कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

COMMENTS