बॉलिवूड मुंबईतच राहील-योगी आदित्यनाथ

बॉलिवूड मुंबईतच राहील-योगी आदित्यनाथ

मुंबई – आम्ही बॉलिवूड घेऊन जायला आलो नाही, आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत. तसेच बॉलिवूड मुंबईतच राहील अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत आले आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बॉलिवूडला मुंबई बाहेर नेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले ‘उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभारण्याची आमची योजना आहे. यासाठी आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चाही केली आहे. ते सुद्धा या फिल्मसिटीसाठी उत्सुक आहेत. या प्रस्तावित फिल्म सिटीसाठी आम्ही नोएडा येथे १ हजार हेक्टर जमीन खरेदी करणार आहोत. फिल्मसिटीची ही जागा जेवर विमानतळाजवळ आहे. ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

COMMENTS