” राज्यातील 48 पैकी 40 जागा महायुती जिंकणार !”

” राज्यातील 48 पैकी 40 जागा महायुती जिंकणार !”

मुंबई – राज्यातील 48 पैकी 37 ते 40 जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मुंबईत दीड-दोन तास रांगेत उभं राहुन लोकांनी मतदान केलं. त्यांना कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की मोदी आले पाहिजेत म्हणून आलोत. राहुल गांधी-राज ठाकरे काहीही बोलतात. याचा परिणाम म्हणुन कोणी त्यांना मत दिली तर अडचण नको म्हणुन आम्ही मतदानाला आलो आहोत”, असं आपल्याला लोकांनी सांगितलं.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा घेत भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या या सभांचा भाजपलाच फायदा होणार असून राज्यातील 48 पैकी 37 ते 40 जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा तावडे यांनी केला आहे.

तसेच शरद पवारांना पराभव समोर दिसत असून आता अपयशाचं खापर फुटू नये म्हणून ते ईव्हीएकडे बोट दाखवत असल्याची टीकाही तावडे यांनी पवारांवर केली आहे.

COMMENTS