मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला हे शोभत नाही, भाजप आमदाराचं जोरदार टीकास्त्र !

मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला हे शोभत नाही, भाजप आमदाराचं जोरदार टीकास्त्र !

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षातील नाराज आमदारानं टीका केली आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला हे शोभणारं नाही असं नाराज असलेले भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे. यबाबतचं प्रसिद्धी पत्रक जारी करत आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं परंतु या पत्राचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं नसल्यामुळे मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीने या विषयाची हेटाळणी करणं हे सोभा देत नसल्याची टीका देशमुख यांनी केली आहे.

काटोलचे आमदार आणि भाजप नेते आशीष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य, युवक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे नमूद करून नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. शहरातील महत्त्वाकांक्षी असलेला मेट्रो रेल्वेचा प्रकल्प थांबवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती कार्यक्रम घ्यावा, असे सरकारला का वाटत नाही, असा प्रश्न उपस्थित करून या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आशीष देशमुख यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास कधीही होऊ शकत नाही. विदर्भाच्या विकासासाठी समर्पित असले तरी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी स्वत: आंदोलन केले. उपोषण आणि मोर्चे काढण्यात आले. त्यासाठी आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याचा आपणाला विसर पडला असल्याची टीका देशमुख यांनी केली असून मुख्यमंत्र्यांच्यावतीने त्यांच्या सरकारने माझ्या पत्राला दिलेला प्रतिसाद धक्कादायक व समस्त वैदर्भीय जनतेचा अपमान करणारा असल्याची टीकाही देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीने या विषयाची हेटाळणी करणे शोभणारे नसल्याची टीकाही आशिष देशमुख यांनी केली आहे.

COMMENTS