राजू शेट्टींवर दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ – शेलार

राजू शेट्टींवर दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ – शेलार

सांगली – कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता किसान मोर्चा तर्फे आयोजित “किसान आत्मनिर्भर यात्रेला” आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या जन्मभूमीतून सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका केली.

रयत क्रांती संघटनेचे नेते  आमदार सदाभाऊ खोत यांनी आजपासून किसान आत्मनिर्भर यात्रेस सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत शेलार यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. त्यात एक शिक्षक मोहापायी वाहवत जातो. शेवटी त्याला हाती तुणतुणे हाती धरण्याची वेळ येते. आताही तेच चित्रं दिसत आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या एका नेत्याला एका विधानपरिषदेसाटी हाती तुणतुणे धरण्याची वेळ आली आहे. फडावर जसं तुणतुणं हाती घ्यावी लागतं तसंच एक दलाला विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीची बाजू घेऊन तुणतुणे वाजवत आहे, अशी टीका शेलार यांनी केली

COMMENTS