औरंगाबादनगर आता या शहराचे नामांतर करण्याची मागणी

औरंगाबादनगर आता या शहराचे नामांतर करण्याची मागणी

अहमदनगर ; औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, यावरून सध्या राज्यातील राजकारण तापले असतानाच अहमदनगरचेही नामांतर करून अंबिका नगर करा, अशी मागणी होऊ लागली आहे.

मागील काही दिवसांपासून औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेनेचेच्यावतीने करण्यात येत आहे. त्यावर कॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाष्य करताना हा समान कार्यक्रमाचा भाग नाही, म्हणत नामांतरास विरोध केला. त्यामुळे शिवसेना-कॅंग्रेसमध्ये तूतू-मैमै सुरु आहेत
त्यात आता शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अहमदनगरचे अंबिकानगर करावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ २८ मे १४९० या दिवशी मलिक अहमदने रोवली. त्याच्या नावावरून शहराला अहमदनगर नाव देण्यात आले.

COMMENTS