त्यामुळे भाजपसोबत जाण्याचं उद्धवजींनी ठरवलं – आदित्य ठाकरे

त्यामुळे भाजपसोबत जाण्याचं उद्धवजींनी ठरवलं – आदित्य ठाकरे

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेना-भाजपची युती झाली आहे. यापूर्वी शिवसेनेनं एकला चलोची भूमिका घेतली होती. अनेकवेळा भाजपवर टीकाही केली होती. यानंतरही शिवसेनेनं भाजपसोबत युती केली. शिवसेनेनं भाजपसोबत युती का केली याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या युतीच्या घोषणेनंतर काही लोकांचं हायपर टेन्शन कमी झालं तर काही लोकांचं वाढलं आहे. आजकाल कोणी म्हणतं दिवसातून दोनदाच खा, काही म्हणतात दोन तासांनी खा. नेमकं काय करावं, कधी खावं काहीच कळायला मार्ग नव्हता. यामुळे टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’, यांच्यासोबच जाण्याचं उद्धवजींनी ठरवलं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS